गेल्या काही दिवसांच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली (Stock Market Crash). सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 900 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 240 हून अधिक अंकांनी घसरला. तथापि, बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स 426 अंकांनी घसरला आणि 79,924 च्या पातळीवर बंद झाला आणि निफ्टी 108 अंकांपेक्षा अधिक घसरून 24,324 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील शीर्ष 30 समभागांपैकी केवळ 10 समभाग वधारले. उर्वरित सर्व समभाग लाल रंगात होते.
सर्वात मोठी घसरण महिंद्रा अँड महिंद्राच्या समभागात ७ टक्क्यांपर्यंत झाली. यानंतर टाटा स्टील, टीसीएस आणि एसबीआय या समभागांमध्ये घसरण झाली. बँक निफ्टीही 380 अंकांनी घसरून 52,189 रुपयांवर बंद झाला. एवढ्या मोठ्या घसरणीमुळे सेन्सेक्सचे मार्केट कॅप सुमारे 7 लाख कोटी रुपयांनी घसरले, म्हणजेच गुंतवणूकदारांचे मूल्यांकन सुमारे 7 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
या पाच समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली
एसी उत्पादक कंपनी ब्लू स्टारचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक, एमसीएक्सचे शेअर्स 4 टक्क्यांनी, बंधन बँकेचे 4 टक्के, बीएसईचे शेअर 4 टक्क्यांनी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 6.61 टक्क्यांनी घसरले. याशिवाय SBI आणि PNB सारख्या बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
शेअर बाजार का पडला?
पुढे काय होणार?
अर्थसंकल्पापर्यंत बाजार अस्थिर राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सरकार पैसा कुठे खर्च करणार आहे आणि अर्थव्यवस्थेबाबत कोणती पावले उचलणार आहे, हे केंद्र सरकार स्पष्ट करत नाही तोपर्यंत बाजारात चढ-उतार होणारच.